Thursday, September 29, 2011

कारण मी कधीच रिस्क घेत नाही

I never take risk: A husband wife story


- दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||१||
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो, शिवाजीमहाराज मंद हसत असतात, स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||२||
मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ! मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||३||
मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ... मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते, फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो, शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको गॅसवर मोरीच ठेवत असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||४||
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको माझ्याकडे बघून हसत असते, शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो, पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||५||
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो, गॅसही फळीवरच असतो.. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो, मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते, ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत.. जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो... कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६|| --

Tuesday, September 27, 2011

आणखि काहि चो-या

पांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्ट र प्रधान हतबुद्धच झाले. त्यांनी विचारले,''काय रे पांडू, हा काय प्रकार?''

''अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.''

इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्ान् पडून इ. प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला. पहिल्या पोराला विचारलं,''तुझं नाव काय आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत?''
...
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला,''माझं नाव नन्या. मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.''

आता दुसरा मुलगा.''माझं नाव मन्या. मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

तिसरा मुलगा.''माझं नाव विन्या. मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला,''माझं नाव
शेंगदाणे

------------------------------

राम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं.
राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.
ते पाहून रावण आपली सश्त्र खाली ठेवतो
आणि तिथून निघून जायला लागतो.

... राम: काय झालं?

रावण: काही नाही... मी निघतो.

राम: ए पण काय झालं सांग ना. ...

रावण: काही नाही यार बास झालं.

राम: अरे असं काय करतोस? काय झालं ते तर सांग. . . .

रावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती?.

///////

गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ......

त्यात एक कुत्रा हि नाचत होता....

लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? " .........

त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना

Friday, September 23, 2011

वैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये


टंप्या -अरे झंप्या कंटाळा आलाय रे !

झंप्या-अरे ,मग दरवाजा उघडू नकोस ,राहू दे त्याला बाहेरच !

वैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,


ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये ! :P :P :P
.
.
.
.
.
.
.
.

//


सातवी आठवीतली काही मुलं-मुली

एका बंदिस्त खोलीत खेळत होती....

तेवढ्यात एका मुलाने एका मुलीचा मुका घेतला

आणि एका मुलाने ....एका मुलीला उचलून घेतले.......

तेवढ़यात त्यांचे पालक तिथे टपकले ...

आणि जोरात ओरडले ..." अरे हे काय चालू आहे ..??"
.
.

सगळेजण एकसुरात ओरडले ...
" आम्ही BIG BOSS BIG BOSS खेळतोय.."
///
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........
चड्डी फाटेल रे ...

//

एकदा एक माणूस डॉक्टर कडे पळत पळत जातो,
आणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप जुलाब होतात,
डॉक्टर म्हणतात हे घ्या गोळी.
माणूस गोळी आणि नंतर म्हणतो आता आधी एक बादली पाणी द्या बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत.

//

भारतात 40 टक्के लोक दूध पीत नाहीत. लंडनमध्ये आतापर्यंत एकही जुळ जन्माला आलेलं नाही. नेपाळमध्ये वाघ माणसासोबत झोपतात. सापाला हवेत फेकलं, तर दहा मिनिटांपर्यंत तो उडू शकतो. झेब्राला हृदय नसतं. हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने एकावेळी तीन मोबाइल battery चार्ज होऊ शकतात.
.
.
.
.
..
हे सगळे points चुकीचे आहेत. बोअर झाल,म्हणून टाइमपास kela.. बारकाईने वाचल्याबद्दल आभारी आहे !

//

पहिला : मला असा माणूस माहीत आहे की ज्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो.
दुसरा : वा!...याला म्हणतात प्रेम.
पहिला : पण डॉक्टर म्हणतात पॅरॅलिसिस.....

//

चम्या त्याचा बायकोची किस घेत असतो, तेवढ्यात त्याचा नोकर गम्या पाहतो, आणि मालकाला विचारतो हे काय सुरु होते,
चम्या :- काही नाही साखर खात होतो.
४ दिवसांनी गम्या ला पण काहीतरी गोड खावेसे वाटते म्हणून तो चिंगी म्हणजे चम्याची पोरगी हिला किस करताना चम्या त्याला पकडतो आणि काय करतो म्हणून विचारतो
गम्या:- मी पण साखर खातो,
चम्या:- त्यासाठी नवीन पोते कशाला फोडले रे?

//

मामलेदार कचेरीतुन रीटायर्ड झाल्यावर भाऊ साहेब
आपल्या कुटुंबाला राधाक्काना घेवुन फिरायला गेले होते.
गावच्या नदिवरचा पुल क्रॉस करायचा होता, पुलावरुन थोड पाणी वहात होत.
अंदाज न आल्यान पुल क्रॉस करता करता पाणी कमरेपर्यंत पोहोचले.
भाऊ साहेबांना तशात विनोद करायची हुक्की आली.ते राधाक्कांना म्हणाले.
"ऎकलत का? छोटे मामलेदार साहेब भिजलेत म्ह्टल"
त्या वर राधाक्का म्हणाल्या." अहो छोट्या मामलेदार साहेबांच काय
सांगताय? इथ कचेरीत तर केंव्हाच पाणी घुसलय"

//

आपला चम्या सरबताची गाडी सुरु करतो,एक दिवस सगळे कपडे फाटले, लंगडत लंगडत अश्या अवस्थेत घरी येतो.
परया विचारतो काय झाले रे?
चम्या :- आईच्या गावात, तिकडे पठाण वाडीत गेलो होतो, आणि फक्त आवाज दिला अरे आओ अपनी प्यास बुजालो, आणि त्यांनी हे असे केले.

///

एकदा चम्या पुला वरून जात असतो.
एक सुंदर पोरगी पुलावरून उडी मारणार असे त्याला दिसते.
तो धावत जावून तिला समजून सांगतो, पण ती जीवच देणार असते शेवटी.
तर तो तिला म्हणतो कि जीव च देतेस तर जाताना मला एक किस तरी देऊन जा.
किस घेतल्यावर तो तिला म्हणतो कि एवढा सुंदर किस मी आज पर्यंत कधीच नाही मिळविला.
का जीव देतेस तू, तुज्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही.
ती मुलगी म्हणते माज्या घरच्याना मी मुलगा असून मुलीचे कपडे घालून फिरलेले नाही आवडत म्हणून.