Monday, October 28, 2013

एक छोटीशी गोष्ट....

एक छोटीशी गोष्ट....आवडली तर नक्की शेअर करा!

" गणपतीपुळेच्या समुद्रकिनार्यावरून विशाल व कपिल हे जिवलग मित्र फिरत होते,
बोलता बोलता त्यांच्या मध्ये छोट्याश्या गोष्टीवरून वाद झाला, व कपिलने विशालला कानाखाली मारली,

त्यावेळी विशाल काहीच बोलला नाही व त्याने खालील वाळू वर लिहिले कि,
" आज माझ्या जवळच्या मित्राने मला कानाखाली मारली "

थोड्यावेळाने ते दोघे समुद्रात स्नान करायचे ठरवतात,
स्नान करताना विशालचा तोल जातो व तो समुद्रामध्ये बुडायला लागतो ......

त्यावेळी कपिल त्याला वाचवितो, बाहेर आल्यावर विशाल एका दगडावर लिहितो कि, " आज माझ्या जवळच्या मित्राने माझे प्राण वाचविले"

ते वाचून कपिल म्हणतो :- जेव्हा मी तुला दुखविले तेव्हा तू वाळू वर
लिहिलेस व जेव्हा मी तुला वाचविले तेव्हा तू दगडावर लिहिलेस .. असे का ??

विशाल :- " जेव्हा कोणी आपल्याला दुखवितो, आपण ती गोष्ट वाळूवर लिहायला पाहीजे , जेणेकरून माफीचा वारा व दोस्तीची शीतल लाट येऊन लगेच ते पुसून टाकेल .....
पण जेव्हा कोणी आपल्याला सुखवितो तेव्हा आपण ती गोष्ट दगडावर कोरायला पाहीजे, जेणेकरून सोस्याटाचा वारा किंवा कोणतीच लाट ते कधीच पुसू शकणार नाही "

तात्पर्य :- " काच फक्त एकदाच तडकते व नंतर ती फक्त आणि फक्त फुटतच जाते.
आपल्या नात्याची तडकत आलेली काच कशी चमकावयाची हे आपल्याला ह्या गोष्टीवरून शिकायला मिळते 
Posted by - आईच्या गावात अन १२ च्या भावात. on Facebook

No comments:

Post a Comment