Tuesday, November 3, 2009

Hitchintak

हितचिंतक
----

एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो.एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला,"थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोख्यावर पडेल".मी थांबलो,अन काय आश्वर्य खरेच वरुन एक आख्खीच्या आख्खी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वळून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजूबाजूसही लोकं अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.

असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो.हातात हिने खरेदी केलेल्या कपड्यांच्या पिशव्या होत्या.ही बरीच मागे आपली पर्स सांभाळण्यात गुंतली होती.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवशीचा आवाज ऐकू आला,"थांब,एक पाऊलही पुढे टाकू नकोस.एका ट्रकचा ताबा सुटलाय अन तो लाल दिवा तोडणार आहे".अन खरंच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.
मी हडबडलो.तू कोण आहेस? मी जोरात म्हणअलो पण कुणीच उत्तर दिले नाही.पण तो आवाज मला माझ्या मनाचा वाटत होता.मी मनातच विचारलं,"तू कोण आहेस?"
तो म्हणाला,"तुझा मित्र,हितचिंतक,तुझ्या प्रारब्ध!"
मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो,"थँक यू!"
तो जडावलेल्या स्वरात म्हणाला,"वेलकम"
मी रडत रडत प्रश्न केला,"खूप ऊशीरा भेटलास रे!,मी लग्न करताना कुठे होतास?"
तो रागात म्हणाला,"तो थेरडा भटजी माईकवर एवढ्या जोराजोरात मंगलाष्टके म्हणत होता की माझा आवाज तुझ्या कानांशी पोचण्या आधीच विरुन गेला!!!"