Wednesday, February 12, 2014

व. पु. काळे यांचे चार शब्द

Via Pu Kale : Quotes to remember.

व. पु. काळे यांचे चार शब्द जरुर वाचा...

⚪ कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. 

⚫ पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

 वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

🔵 कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

⚪ आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

⚫ समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

 संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

🔵 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

⚪ वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

⚫ खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

 सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

🔵 चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!

⚪ तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

⚫ औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

 गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले!

🔵 अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

⚪ भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

⚫ आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

Tuesday, February 11, 2014

आणखी बोलक्या रेषा - Bolkya Resha

बोलक्या रेषा

You can find all collection here: http://www.bolkyaresha.marathi-unlimited.in/
http://www.bolkyaresha.marathi-unlimited.in/
















All rights of Bolkya Resha reserved by Bolkya Resha: Jivanatil Kahi Hasyachitre, Ghanshyam R Deshmukh : Bolkyaresha art studio, illustrations, cartoons, comics, bolkya resha marathi cartoons. 
Profile of Mr. Ghanshyam R Deshmukh can be found here: http://www.bolkyaresha.marathi-unlimited.in/about-us/
Thanks to this great cartoonist for his work.

Wednesday, February 5, 2014

Sukh - सुख A Nice Book By Mr. Ganesh Shinde

Sukh सुख


सुख 
सुख कशाला म्हणतात. ते आज कसं हरवलं आहे ? का हरवलं आहे ?
आपल्या पासून दूर असलेल्या वस्तूंच आपल्याला आकर्षण असते. आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. आणि आपल्या जवळ असलेल्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही.......
गणेश शिंदे यांच्याच आवाजात ऐका. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व प्ले बटणवर क्लिक करा.

A Very Nice Book By Mr. Ganesh Shinde.
A small sound clip of the same book - Sukh ,in his own voice is here.
Its a must read book. You can listen to this sound clip and experience the same.



Saturday, February 1, 2014

फाळणी - Poem By Saurabh Vaishampayan

PHALANI-
Marathi Poem By Saurabh Vaishampayan

"फाळणी"
परवाच एका स्फोटात मेलो
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता
सरळ जाण्याचा हाच एक फायदा होता ---१
स्वर्गात जाताच टिळक भेटले
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले
,-- टिळकांनी विचारले...
कय रे स्वातंत्र्यानंतर काही बदललंय का नाही?
म्हटलं, छे हो, सरकारचं डोकं ठिकाणावर नाही
तिथून लगबगीने सुभाषबाबु आले
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -- २
मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घडतय
हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी, आजही आम्ही स्वातंत्र्यासाठी रक्तच
देतो,
फक्त 'खुन' आमचं असतं आणि आझाद काश्मिर
होतो! --३
तितक्यात... दुरवर सावरकर दिसले म्हणुन
धावलो,
म्हटलं 'तात्या' आज जन्माचं पुण्य पावलो
म्हटलं सध्या तरी सगळं कसं निवांत आहे
स्वर्गात कॉंग्रेस वाला नाही तर सगळं कसं शांत
आहे. --४
त्यांनाच विचारलं..
तात्या इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधातुन आपल्याकडेच पाह्तात!
'छत्रपतिंचा विजय असो'म्हणुन चटकन हात
जोडले
पण घडलं भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
-काय रे? कोणत्या जेम्स लेनने म्हणे
बत्तमिजी केली?
तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली?
--५
मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती
आणि महाराजांची नजर माझ्यावरून ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, तुमची स्वप्नं
आम्हाला कळलीच नाही
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे सावज हेरतात
ब्र म्हणायचा अवकाश, लगेच गाढवांचे नांगर
फिरतात. --६
सगळं ऐकुन महाराजांच्या गालावरचे कल्ले थरारले
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यांत
पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,
आणि मग आमचं अस वागणं बघुन रागाने
बिथरले. --७
पाय लटपटले...
वाटलं आता कम्बख्ति भरलीच म्हणुन समज,
चुकीची शिक्षा, आता गर्दन मारलीच म्हणुन
समज
पण मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले नेते'
नव्हते,
न्याय-कठोर असले, तरी ह्रदय त्यांचे 'रीते'
नव्हते. --८
म्हणाले, नांव सांग फक्त, खाली जाऊन समाचार
घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाही'त प्रत्येकाचा विचार
होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो
आणि पैसेवाला दुस-यांच्या जिवाशी खेळतो --९
फक्त एकच काळवीट मारले म्हणत आपले
माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मुश्किलीने डोळ्यांतलं पाणी अडवलं,
कळलं हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवलं.
--१०
मान खाली घालुन मग तसाच पुढे गेलो...
अहो आश्चर्यम! स्वर्गामध्ये औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला.
जिन्हा सुद्धा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर
जाईल,
आणि एके दिवशी मग
स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल... --११
कवी- सौरभ वैशंपायन

Out dated झालंय आयुष्य - Marathi Poem


ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार
(शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला. (Award winning Marathi Poem by Mr. Bablu Vadar)

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते  facebook................